
महिलांची एकी, रोजगार हमीच्या कामावर दाटी
शालू कोल्हे. तालुका मोरगाव अर्जुनी, जिल्हा गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातले सावरटोला हे माझं गाव. गावातल्या गावात रोजगार मिळावा ही इथल्या लोकांची, विशेषत: महिलांची मागणी आहे. एकेकट्याने मांडून प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे आम्ही प्रथम एकत्र यायचं ठरवलं. जवळपास २३० मजूर एकत्र आले आणि विकल्प मजूर संघटना तयार झाली.

मनरेगातून शेततळी, करी समृद्ध शेतकरी
जीवन राठोड
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातून दरवर्षी ५ ते ६ लाख मजूर ऊसतोडीसाठी राज्यात तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मध्यप्रदेश या अन्य राज्यांत जातात. एकट्या माजलगाव तालुक्यातून जवळपास एक लाख मजूर ऊसतोडीसाठी जातात. वर्षातले सहा महिने गावात आणि सहा महिने ऊसतोडीवर हे स्थलांतराचं चक्र चालू राहतं, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.